Friday, October 10, 2008

Report of the Faljyotish (Astrology) Survey

After we announced the survey, within a day or two we received around 150 telephone calls of Astrologers from all over Maharashtra informing us their willingness to participate in our survey. We asked them to send us a stamped envelope and their personal information in a prescribed form.
Meanwhile a team of Astrologers headed by Mr. S. S. Bhat ( President, Maharashtra Jyotish Parishad), Mr. V. D. Bhat (President, Pune Jyotish Parishad) and others met Prof. Kunte at his residence expressing their concern regarding the Survey. Since Dr. Narendra Dabholkar was a party to the organization of the survey, the astrologers were thinking that the survey will be biased. Prof. Kunte explained to them the detailed procedure of the survey and explained to them the fact that Dr. Dabholkar or Dr. Narlikar had no active role in the conduct of the survey. Dr. Kunte as a statistician was solely responsible for the survey and that it will be conducted in as unbiased manner as possible. Further it will be a double blind survey. All this explanation did not convince the Astrologers and in a meeting presided by Mr. S.S. Bhat the astrologers decided to boycott the survey and requested the astrologer’s community to follow suit. In spite of this boycott 51 astrologers from all over Maharashtra did send us the stamped envelopes for getting the horoscopes. They were given one month time to send their results.
Mean while on 01/06/08 Mr Nandkumar Jakatdar of Brahan Maharashtra Jyotish Mandal organized a seminar on the topic ‘Whether surveys are necessary to vindicate the FalJyotish’. In this seminar some astrologers along with Prof. Kunte and Dr. Dabholkar also participated. Dr. Dabholkar explained why astrology is not a science. Prof. Kunte explained the procedure of the current survey in detail. He further mentioned that, if astrology is to establish itself as a science, it can’t escape validation by surveys. Not only the present survey but many such surveys, on many topics, by many workers, repeated several times are necessary before validating astrology as a science. He also mentioned that, since the current survey accepts anybody to participate in the survey, who claims to be an astrologer, the current survey will be able to say something about the community of astrologers as they exist in the society and not about the subject of astrology. Mr. Nandkumar Jakatdar in his concluding remarks said that he could give a set of ten rules which can be used on the horoscopes to answer the question. He also asked the astrologers to participate in such surveys provided they were organized in a fair manner after consultation with the astrologers.
Following this meeting the next day Prof. Kunte met Mr. Jakatdar to discuss this matter further. A suggestion was made to ask the astrological institutions to participate in a separate concurrent survey at the institutional level, wherein the entire set of all the 200 horoscopes, numbered randomly, would be given to each institution and that they can get the horoscopes examined by their members using the common rules. This would be a better test of astrological rules. Mr. Jakatdar agreed to this proposal. He told Dr. Kunte that he would definitely participate in such a survey and further he would discuss this matter with various other institutional heads.
A formal appeal in this regard was sent to many Institutional heads. Unfortunately only two institutions agreed to participate in such a survey. They were Jyotish Vidya Prasarak Mandal headed by Mr. Maratkar, Pune and Chiranjeev Astro Research Institution Pune headed by Ms. Sunanda Rathi.
Mr. Nandkumar Jakatdar for the reasons best known to him decided to back out from the survey. Only Mr. Maratkar did finally submit the answers. Ms. Sunanda Rathi for reasons best known to her did not submit the answers or even communicate her reasons for not responding.
Even though Mr. S.S. Bhat had boycotted the survey, he kept meeting Prof. Kunte to discuss various aspects of astrology. He gave Prof. Kunte one of his books, which according to him is used as a text book on astrology in some university. This book mentions a rule which can be used on a horoscope to decide whether the horoscope belongs to a man or a woman. He claims that the rule gives the correct result at least 60% of the times. We used this rule on the two hundred horoscopes that we have. It predicted the sex correctly for only 94 cases out of 200 cases. If the claim of at least 60% right answers is correct, according to statistics the probability of getting only 94 correct answers is less then 5%. In another meeting Mr. S. S. Bhat gave another rule to decide whether a horoscope belongs to an intelligent person. For this rule again Mr. Bhat gave 60% probability for correct prediction. We used this rule on our 200 horoscopes. It predicted 150 persons out 200 to be intelligent. Out of these 150, 75 were really intelligent and another 75 were mentally retarded. These results speak for themselves.
We now report the results of the present survey. In all 51 astrologers sent us the stamped envelopes to get the horoscopes. Sets of 40 horoscopes were sent to them. At the end of the survey only 27 astrologers sent back their answers. The others did not even communicate their reasons for not responding. Out of the 27 astrologers, 26 astrologers sent their personal details. We give here the general profile of these 26 astrologers:
15 astrologers practice astrology as a hobby, 8 are practicing astrologers and three did not answer the question related to their practice of astrology. For the 8 practicing astrologers their average experience is 14.4 years.
11 astrologers use Nirayan method out of which 3 also use Krishnamurty method, 7 use Sayan method, 1 uses only Krishnamurty method and the remaining 7 did not mention any specific method.

The table below gives the distribution of the astrologers according to the years of experience:
Table

5 or less6-1011-1516-2021-2526-30
369233



As for the correct answers out of 40 given by the astrologers they range between the minimum of 8 and maximum of 24. Only one professional astrologer had 24 correct answers. Two astrologers had 22 correct answers. For the remaining 24 astrologers the number of correct answers was less then or equal to 20. The over all average number of correct answers was 17.25 out of 40 , which is around 45%. One professional astrologer reported 37 intelligent and 3 undecided. He of course got 17 correct answers.
Mr. Maratkar was the only astrologer who had participated in the survey at his institutional level. He was supplied with all the 200 horoscopes randomly numbered. He got them examined by his team members. The answers were verified in the presence of Dr. P.V. Vartak, a well known name in the field of अध्यात्म. It was found out that out of the 200 horoscopes only 102 were correctly identified. Out of the 102 correct answers 51 were of the intelligent students and 51 of the mentally retarded students. This success rate is consistent with the result, which can be obtained by tossing the coin of decision.

To conclude the report, the findings of the present survey, hardly support the claim of the predictive power of astrology on the basis of his horoscopes, at least for the question regarding the intelligence of a person. Of course astrology discusses many other aspect of the personality and behavior of individuals on the basis of their horoscopes. Many other surveys will be needed to say anything conclusively, with confidence, about the subject of astrology as a science or otherwise. This survey for certain, does not support such a claim of astrology being a science. In fact, the present survey goes against astrology being considered as a science.

-----------------------------------------------------------------------------------------------
(Dr. Jayant Narlikar), IUCAA

(Dr. Narendra Dabholkar),Maharashtra ANS

(Prof Sudhakar Kunte)Dept. of Statistics, univ. of Pune.

(Prakash Ghatpande) Coordinator.
=====================================================================================



Thursday, October 09, 2008

फलज्योतिष चाचणीचा अहवाल

फलज्योतिष चाचणी प्रसिद्ध झालेवर १-२ दिवसातच आम्हाला अंदाजे १५० दुरध्वनी आले. विचारणा करणा-या व्यक्ती महाराष्ट्रभर पसरलेल्या होत्या. आम्ही त्यांना पोस्टाची तिकीटे असलेला लिफाफा व विहित नमुन्यातील स्वत:बद्दलची माहिती पाठवण्यास सांगितले.

दरम्यान एक ज्योतिषांचे मंडळ श्री सुधाकर कुंटे यांना भेटले. या मंडळात प्रमुख श्री श्री श्री भट अध्यक्ष महाराष्ट्र ज्योतिष परिषद , श्री व.दा. भट अध्यक्ष पुणे ज्योतिष परिषद व अन्य काही ३-४ ज्योतिषी होते. श्री नरेंद्र दाभोलकर यांचा या चाचणीत सहभाग असल्याने या ज्योतिषी लोकांचा चाचणीच्या विश्वासार्हतेवर आक्षेप होता. प्रा कुंटे यांनी चाचणीबाबतची सर्व माहिती दिली. तसेच डॊ.नारळीकर व डॊ दाभोलकर यांचा या चाचणीतील प्रत्यक्ष सहभाग वा हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट केले.त्यांनी पुढे असेही सांगितले कि ही चाचणी संख्याशास्त्रज्ञ या नात्याने व जबाबदारीने ते स्वत:च हाताळणार आहेत.ही चाचणी जास्तीत जास्त निरपेक्ष व 'डबल ब्लाईंड' या पद्धतीने हाताळली जाणार आहे.परंतु हे स्पष्टीकरण ज्योतिषी मंडळास पुरेसे समाधान कारक वाटले नाही व दि. १८ मे रोजी झालेल्या पुण्यातील ज्योतिषांच्या सर्वसाधारण सभेत चाचणीवर बहिष्कार घोषित केला. या सभेचे अध्यक्ष श्री श्री भट हे होते.

Sunday, October 05, 2008

Press Conference - Astrology Survey

पत्रकार परिषद



सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ डॊ. जयंत नारळीकर यांची फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी या एका वेगळ्या विषयावरील पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
स्थळ:- पत्रकार भवन, नवी पेठ पुणे;
दिनांक व वेळ :- मंगळवार दि. ७ आक्टोंबर २००८, दुपारी ४.०० वाजता.

------------------------------------------------------------------------------

पत्रकार परिषदेचा विषय
फलज्योतिषामधील शास्त्रीय तथ्य़ांशाबाबत परदेशात अनेकविध चाचण्या झाल्या आहेत.या संदर्भातील भारतातील पहिली वैज्ञानिक चाचणी तयार करण्यात आली होती. त्याची माहिती डॊ जयंत नारळीकर यांनी १२ मे २००८ च्या पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. सदर चाचणीचा निकाल आता हाती आला असुन पत्रकार परिषदेत डॊ नारळीकर सविस्तर जाहीर करणार आहेत . या प्रक्रियेमध्ये आयुका, पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती यांचा सहभाग आहे. त्यांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेत उपस्थित असतील.

प्रकाश घाटपांडे - चाचणी प्रकल्प समन्वयक
http://faljyotishachikitsa.blogspot.com
भ्रमणध्वनी- ९९२३१७०६२५

Thursday, October 02, 2008

फलज्योतिष चाचणी समन्वय

फलज्योतिष चाचणी समन्वय

चाचणीची पार्श्वभूमी
"फलज्योतिष चिकित्सा मंडळ" या अनौपचारिक संवादी भुमिकेतुन कै. माधव रिसबुड व मी १९८८ पासुन फलज्योतिषाची चिकित्सा करत असु. त्यातुनच ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाचा २००१ मध्ये जन्म झाला. पुस्तक प्रकाशन माधव रिसबुडांच्या हस्ते झाले. प्रकाशनाच्या निमित्ताने ज्योतिषी नंदकिशोर जकातदार व डॊ दाभोलकर

यांचा वाद संवाद एकाच व्यासपीठावर प्रथमच घडवुन आणला. पुस्तकाच्या निमित्ताने प्रो. नारळीकरांशी संपर्क आला. चर्चा झाली. पुस्तकाच्या दुस-या आवृत्तिचे १३ एप्रिल २००३ च्या रविवार लोकसत्ता मध्ये त्यांनी सविस्तर परिक्षण लिहिले होते. त्यामुळे लोक पुस्तक विकत घेउन वाचण्यास प्रवृत्तही झाले होते.आपल्याला इथे ते परिक्षण पहाता येईल. फलज्योतिषाची एक वैज्ञानिक चाचणी व्हावी अशी भुमिका त्यांनी मांडली होतीच. अर्थतज्ज्ञ कै. वि. म दांडेकर यांनी मतिमंद मुलांच्या व हुषार मुलांच्या कुंडल्यांवर त्यांना समंजस वाटणा-या ज्योतिषांच्या समन्वयातुन

Thursday, September 18, 2008

कै.माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक

सप्टेंबर २००८ चा अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्र चा ज्योतिष विशेषांक पाहिला अन माधव रिसबुडांची आठवण तीव्रतेने झाली. माधव रिसबुड २००३ साली निवर्तले.खालील लेख खरं तर मी अंनिस वार्तापत्राच्या एका दिवाळी अंकासाठी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबुडांनी ज्योतिष चिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठीकाणी वकीली केली होती. अंनिस चे हितचिंतक असलेल्या या कठोर फलज्योतिष चिकित्सकावर लिहिलेला लेख वार्तापत्राच्या संपादक मंडळाने नाकारला. कारण म्हणे त्यात व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होते. मनोगतच्या संपादकांना तसे विरोपाद्वारे मी कळविले होते. अंनिस वार्तापत्राने हा नाकारलेला लेख मनोगत च्या दिवाळी २००७ च्या अंकात जालावर प्रसिद्ध झाला आणि ख-या अर्थाने रिसबुडांना श्रद्धांजली वाहिल्यासारखे वाटले. इथेही तो पहाता येईल.

कै.माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक
माझ्या महंमद रफिक शेख मेहबूब पटेल अशा लांबलचक नावाच्या बिनतारी मित्राला पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात फिरताना एक छोटं पुस्तक रसिक साहित्य या दुकानातल्या शोकेसवर लावलेले दिसले. त्यानं ते पुस्तक घेतलं आणि मला मुंबईला बिनतारी यंत्रणेवर कळवले की," अरे पका, ज्योतिषावर एक तुझ्या विचारांच एक पुस्तक मला मिळाले आहे. त्याच नांव आहे 'फलज्योतिष विद्येवर शोधकिरण'.

Saturday, September 06, 2008

नशीब

नवमस्थान हे प्रारब्ध संचित भाग्य यांचे स्थान आहे. तुम्हाला नशीबाची किती साथ आहे हे पहाण्यासाठी नवमस्थानातील ग्रह,नवमस्थानातील राशी, नवमेश हे पाहणे ज्योतिषात क्रमप्राप्त असते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे या नशीबाविषयी काय म्हणतात ते पहा.

Tuesday, August 19, 2008

ज्योतिषांची वर्गवारी

ज्योतिषांची वर्गवारी
पारंपारिक, हौशी, व्यावसायिक, आधुनिक अशी ज्योतिषांची वर्गवारी करता येईल. घराण्यात असलेला ज्योतिषाचा पारंपारिक व्यवसाय पुढच्या पिढीने स्वीकारला तो झाला पारंपारिक ज्योतिषी. पंचांग पहाता येते व पुजा सांगता येते एवढ्या मर्यादित भांडवलावर धार्मिक परंपरेचा भाग म्हणून जरी ज्योतिषाचा व्यवसाय एखाद्या पुरोहित कम ज्योतिषाने केला तरी तो पारंपारिक ज्योतिषी म्हणुन मान्यता प्राप्त होतो. खेडेगावात बहुजन समाज हा ज्योतिष विषयक प्रश्न पहायला भिक्षुकीचा व्यवसाय करणा-या काकांचीच निवड करतो.

Sunday, August 10, 2008

ज्योतिषी कुणाला म्हणायचे?

ज्योतिषी कुणाला म्हणायचे?
ज्योतिषी कुणाला म्हणायचे यात ज्योतिषांमध्येच मतभेद आहेत. अनेक मान्यवर ज्योतिषांच्या स्वत:च्या ज्योतिष संस्था आहेत. त्यात ज्योतिषपंडीत ज्योतिषशास्त्री, होराभुषण, होरामार्तंड अशा उपाधी वा पदव्या देणारे अभ्यासक्रम असतात. त्याची फी असते. ती भरुन जो अभ्यासक्रम पुर्ण करतो असे त्या ज्योतिषसंस्थाचालकाला वाटते त्याला तसे संस्थेकडुन त्या उपाधिचे प्रमाण पत्र मिळते. प्रत्येक संस्थेचे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. त्यात प्रमाणीकरण नाही. ज्या हौशी लोकांना ज्योतिषी म्हणवुन हौस असते त्यांना ती येथे पुर्ण करता येते. यात डॊक्टर्स इंजिनियर व्यापारी, नोकरदार सर्व प्रकारचे लोक असतात. डॊक्टर ने हा अभ्यासक्रम पुर्ण केला म्हणजे त्याला वैद्यकशास्त्राची मान्यता मिळाली असा होत नाही.डॊक्टर, इंजिनियर, वकिल, चार्टर्ड अकाउंटंट आर्किटेक्ट हे व्यवसाय करण्यासाठी शासनमान्य विद्यापीठाची शैक्षणीक पदवी लागते व व्यवसाय करण्याची शासनाची सनद लागते. तसे ज्योतिषात नाही.

Friday, August 08, 2008

चित्रमय जगत

फलज्योतिष संबंधाने विचारी माणसाचे कर्तव्य
फलज्योतिष संबंधाने विचारी माणसाचे कर्तव्य' या चित्रमय जगत च्या जानेवारी १९२१ च्या अंकातील लेखात सत्यान्वेषी लिहितात," .........एक कमिटी स्थापन करावी व तिने गणित व तर्कशास्त्राचा अभ्यास केलेल्या विद्वानास या शास्त्राच्या संशोधनाचे कामी निधितुन द्रव्यसाहाय्य द्यावे. या शास्त्राचा शोध करणारांस तर्कशास्त्राचे ज्ञान असणे का इष्ट आहे हे उघड आहे. कोणत्या नियमास अनुसरुन सिद्धांत केलेला खरा असतो, सिद्धांतात चुक राहु नये यास्तव कोणते दोष टाळायचे असतात हे तर्कशास्त्रज्ञास माहित असते. यास्तव काहीतरी अनुमान काढायचा प्रमाद त्याच्याकडून फारकरुन घडत नाही. ह्या शास्त्राच्या सध्याच्या स्थितीत कोणत्या गोष्टी निश्चयाने सांगता येतात व कोणत्या नाही हे आकडेवार माहितीने ठरवुन ते शोध कमिटीने प्रसिद्ध करावे, आणि व्यक्तिला उपयुक्त अशा गोष्टी ज्योतिषास सांगता येतात अशी खात्री होईल तर फलज्योतिषशास्त्रात परिक्षा घेउन लायक माणसास सर्टिफिकेट द्यावे व ढोंगी ज्योतिषाविरुद्ध सरकार कडुन एखादा कायदा पास करवून घ्यावा."

Tuesday, June 10, 2008

वि. म. दांडेकर

वि म दांडेकरांकडे मी १९८८ च्या दरम्यान गेलो होतो. मतिमंदत्व , वैवाहिक सौख्या बाबत घटस्फोटित हा विषय असा वि म दांडेकरांच्या संशोधनाचा विषय होता . त्यांना ज्योतिषाबद्दल आस्था होती. मी त्यांना म्हणालो कि ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात असे अनेक जोडपी आहेत त्यांचे काय? (लिव्हिंग सेपरेशनशिप हा शब्द त्यावेळी सुचणे शक्य नव्हते. ) सुखाने नव्हे तर नाईलाजाने एकत्र राहणार्‍या जोडप्यांचा प्रश्न कसा हाताळणार? त्यांनी फक्त कायदेशीर दृष्ट्या जे घटस्फोटित आहे त्याचाच विचार करणार असल्याचे सांगितले . ज्योतिषजगतात हे मान्य होणार नाही असे मी त्यांना सांगितले होते. (ते पुढे खरेच झाले)
वि.म कधी वारले ते मला आठवत नाहि पण १९९९ पुर्वी. त्या आगोदर काही काळ भारत इतिहास संशोधक मंडळातील ज्योतिषांच्या कार्यक्रमात त्यांनी मतिमंदाच्या शंभर कुंडल्यांसाठी जर शंभर नियम असतील तर त्यात काही अर्थ नाही. असे सांगितले होते. तेव्हाही मी कार्यक्रमाला हजर होतो. हा पहा वि म दांडेकरांचा सा.सकाळ मधील ८ जुलै १९८९ चा लेख

Saturday, May 31, 2008

फलज्योतिषाला विज्ञानाचा आधार आहे काय?"

"फलज्योतिषाला विज्ञानाचा आधार आहे काय?"
या विषयावर "वाचकांचे व्यासपीठ" या सदरात अठरा पत्रे प्रसिद्ध झाली आहेत.(दै.सकाळ शनिवार३१ मे २००८).त्यांत श्री. प्रकाश घाटपांडे यांचे पत्र केंद्रस्थानी ठळक टंकात छापले आहे ते येणे प्रमाणे:

....
वैज्ञानिक चिकित्सेकडे ज्योतिषांची नेहमीच पाठ
प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी फलज्योतिषाची संख्याशास्त्रीय चाचणी घेण्याचे आवाहन समस्त ज्योतिर्विदांना केले आहे.या निमित्ताने या विषयावरील चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.समस्त ज्योतिर्विदांनी यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रसिद्ध अर्थतञ्ज्ञ (कै) वि.म.दांडेकरांनी यापूर्वी फलज्योतिषाच्या चाचणीचे प्रयत्‍न केले होते.’सप्ताहिक सकाळ दि. ८ जुलै१९८९ च्या भविष्य विशेषांकात ते म्हणतात: "शंभर मतिमंद मुलांच्या कुंडल्या व शंभर सर्वसामान्य मुलांच्या कुंडल्या घेतल्या, तर त्यात फलज्योतिषाच्या काही योगांचा तरी फ़रक दिसावयास हवा.तसेच शंभर घटस्फोटितांच्या पत्रिकांमधे काही योग प्रामुख्याने दिसावयास हवेत. पण माझ्या जवळ ज्या कुंडल्या गोळा झाल्या आहेत त्यांवरून तरी हा फ़रक दिसून येत नाही."
भारत इतिहास संशोधन मंडळातील ज्योतिषांच्या कार्यक्रमातील भाषणात त्यानी म्हटले होते की जर शंभर कुंडल्यांसाठी शंभर नियम असतील तर तो नियम कसला?" आव्हान या प्रकाराशिवाय फलज्योतिषाची सत्यासत्यता पडताळणीसाठी काही प्रयत्न पूर्वीही झाले. सन १९३५ मध्ये रा.ज. गोखले या पुण्यातील भूगोल शिक्षकाने "फलज्योतिष चिकित्सा" नावाचे एक पुस्तक लिहून त्याची सर्व चिकित्सा केली होती.फलज्योतिषाची सत्यासत्यता तपासण्यासाठी त्यांनी एका निर्णायक समितीची स्थापना केली.ज्योतिर्विदांना एक विनंती केली की आपले वर्तविलेली भविष्यें त्यांनी निर्णायक समितीकडे पाठवावी.त्यासाठी यथोचित पारितोषिकही देण्याची तयारी ठेवली होती.पण त्यासाठी त्यांनी फलांसंदर्भात अटी घातल्या.याचा फ़ारसा परिणाम ज्योतिषांवर झाला नाही व त्यांनी प्रतिसादही दिला नाही.
..........................................................प्रकाश घाटपांडे, पुणे

Tuesday, May 20, 2008

पुण्यातील १९३५ साली फलज्योतिष चाचणीचे आवाहन

रा ज गोखले या भुगोलाचे शिक्षक असलेल्या गृहस्थांनी १९३५ साली लिहिलेल्या "फल्ज्योतिष चिकित्सा" या पुस्तकातील उतारा पहा. त्याकाळी देखील चाचणीचे प्रयत्न झाले होते.

FaljyotishaChikitsa 020
FaljyotishaChikitsa 021a
FaljyotishaChikitsa 021b
FaljyotishaChikitsa 022 a
FaljyotishaChikitsa 022 b

प्रकाश घाटपांडे

Monday, May 19, 2008

फलज्योतिष चाचणी च्या निमित्ताने

सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांनी फलज्योतिषाच्या संख्याशास्त्रीय चाचणीकरता समस्त ज्योतिषांना केलेल्या जाहीर आवाहनानंतर ज्योतिष वर्तुळात एकच खळबळ माजली. जणुकाहि हे एक ज्योतिषांवर मोठे संकट कोसळले असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्याचा एक भाग म्हणुन ज्योतिष परिषद पुणे चे अध्यक्ष श्री व.दा. भट यांनी एक १८ मे २००८ रोजी पुण्यात एक परिषद आयोजित केली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे श्री श्री भट होते. परिषदेत समस्त ज्योतिर्विदांना चाचणीवर आपले विचार व्यक्त करण्याचे आवाहन केले.

Sunday, May 11, 2008

Press Conference - Astrological Test

पत्रकार परिषदेचा विषय
फलज्योतिषामधील शास्त्रीय तथ्य़ांशाबाबत परदेशात अनेकविध चाचण्या झाल्या आहेत.या संदर्भातील भारतातील पहिली वैज्ञानिक चाचणी तयार करण्यात आली आहे.याची माहिती डॊ जयंत नारळीकर देतील. या प्रक्रियेमध्ये आयुका, पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती यांचा सहभाग आहे. त्यांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेत उपस्थित असतील.

स्थळ:- पत्रकार भवन; सोमवार दि. १२ मे २००८, सकाळी ११ वाजता.
प्रकाश घाटपांडे - समन्वयक
http://faljyotishachikitsa.blogspot.com
भ्रमणध्वनी- ९९२३१७०६२५

फलज्योतिष -चाचणी चे आवाहन
फलज्योतिषाला विज्ञानाचा पाया आहे का? हा सर्व जगभर बहुचर्चित विषय आहे. परदेशात याबाबत अनेक संशोधनेही झाली आहेत. पण भारतात आता अधिकृतपणे अशी पहिली संशोधन चाचणी सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॊ. जयंत नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे.त्यामध्ये आयुका ही खगोलशास्त्राची भारतीय पातळीवरील संस्था, पुणे विद्यापीठाचा संख्याशास्त्रीय विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिति यांचा सहभाग रहाणार आहे.चाचणीचे स्वरुप सरळ व सोपे आहे.मतिमंद शाळेत शिक्षण घेणा-या १०० जन्मवेळा त्यांच्या पालकांच्या सहीने जमा करण्यात आल्या आहेत. शाळेत सातत्याने ७० टक्के व यापेक्षा अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांच्या जन्मवेळा याच प्रमाणे जमा केल्या आहेत. मतिमंद असणे वा बुद्धिमान असणे हे व्यक्तिच्या बाबत अत्यंत वेगळी व स्पष्टपणे भिन्न अवस्था आहे. त्याचे प्रतिबिंब आयुष्यातील महत्वाच्या घटनांवर भाष्य करणा-या पत्रिकेत उमटावयास हवे. असे चाचणी संयोजकांचे मत आहे. नामवंत ज्योतिषी, फलज्योतिष संस्था वा हा व्यवसाय करणारी कोणीही व्यक्ती यांना चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन जाहीरपणे करण्यात आले आहे. ज्यांच्या कडून अनुकूल प्रतिसाद लाभेल त्यांना सर्वसाधारणपणे चाळीस जन्मपत्रिका व जन्मवेळेचा तपशील या दोन्ही बाबी पाठवल्या जातील. या तपशीला मुळे आवश्यक वाटल्यास चाचणी देणारी संबंधीत व्यक्ती स्वत:देखील कुंडली बनवू शकेल.त्या कुंडलीद्वारे संबंधीत कुंडली ही मतिमंद मुलाची आहे कि बुद्धिमान मुलाची आहे एवढेच सांगावे अशी अपेक्षा आहे.चाचणी साठी दिलेल्या पत्रिकांतील काही पत्रिका या मतिमंद मुलांच्या तर काही पत्रिका या हुषार मुलांच्या असतील. ज्योतिषांनी कोणती पत्रिका कोणाची हे ९०% अचूक ओळखल्यास फलज्योतिष या विषयाकडे शास्त्र म्हणुन पहाण्यास मर्यादित अनुकुलता प्राप्त होईल.७०% पेक्षा कमी प्रमाणात उत्तरे बरोबर आली तर फलज्योतिष हे शास्त्र नाही हे आपोआपच सिद्ध होईल. ७०% ते ९०% प्रमाणात ज्योतिषाची भाकिते अचूक ठरल्यास आणखी मोठ्या सॆंपल सह चाचणी घेण्यात येईल. कुंडलीच्या आधारे आपले निष्कर्ष पाठवण्यास संबंधितांना पुर्ण एक महिना देण्यात येईल. ही चाचणी पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग हा 'डबल ब्लाईंड टेस्ट' या पद्धतीने घेईल. ज्योतिषांनी डॊ. सुधाकर कुंटे ,संख्याशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ पुणे ४११००७ या पत्त्यावरुन कुंडल्या मागवायच्या आहेत. ही चाचणी पुर्णत: विनामुल्य आहे. मात्र कुंडल्यांचे झेरॊक्स व पोस्टेज यासाठी सहभागी होउ इच्छिणा-यांनी ११'' * ९'' आकाराचे, रुपये ३५ ची तिकिटे लावलेला लिफाफा पाठवणे गरजेचे आहे. याच स्वरुपाच्या आणखी काही चाचण्या पुढील काळात घेण्याचा मनोदय आहे. त्यामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक पाया आहे का? यावर अधिक प्रकाश पडू शकेल. ही चाचणी ही प्राथमिक आहे अंतिम नाही.

Thursday, March 27, 2008

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...प्रश्नोत्तरातून सुसंवाद


ई आवृत्तीच्या निमित्ताने
जेव्हा २००१ मध्ये प्रथम व २००३ मध्ये द्वितीय मुद्रित आवृत्ती प्रकाशित झाली तेव्हा खरं तर मला हे सगळं संकेतस्थळावरच लिहायच होत. म्हणुनच त्याचे स्वरुप एफ ए क्यु असे ठरवले गेले. पण एक विचार मनात आला कि इंटरनेटचा वापर करणारा वर्ग किती? त्यातून अशा प्रकारचे संकेतस्थळ पहायला कोण येणार? आपल्याला जर आपल्या वाचक वर्गापर्यंत पोचायचे असेल तर मुद्रित माध्यम व मराठी भाषा हाच पर्याय आहे. तो इंटरनेटचा वापर करणारा वर्ग नाही. तरी देखिल पुण्या-मुंबई कडचा वर्गच हे वाचणार खेड्यातील वर्ग पुन्हा वंचित राहणार. पण मला माझ्या मर्यादाही लक्षात घेणे आवश्यक होते. त्यानंतर प्रो. जयंत नारळीकरांनी लोकसत्ता १३ एप्रिल २००३ मध्ये परिक्षण लिहिल्याने पुस्तक एकदम प्रकाशात आले. पुढे हे मनोविकास प्रकाशनने प्रकाशित करण्यास रस दाखवला. त्यामुळे ते व्यावसायिक पद्ध्तीने जुलै २००५ वितरित झाले.महाराष्ट्र पोलिस बिनतारी विभागातून अपघातानेच मी स्वेच्छानिवृत्त झालो व नंतर उपक्रमावर अपघातानेच आलो. वाटल आपलं पुस्तक जर महाराष्ट्राबाहेरील व परदेशी मराठी बांधवांना वाचायच असेल तर तो वर्ग हे पुस्तक मुद्रित स्वरुपात उपलब्ध करुन वाचू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला ई आवृत्तीच काढली पाहिजे. मग लेखमाला स्वरुपात हे टाकत राहिलो. उपक्रमामुळे हे ई - आवृत्ती स्वरुपात येण्यात मला अतिशय आनंद होतो आहे. उपक्रम व उपक्रमींचे मी प्रोत्साहनाबद्दल आभार मानतो.
पुस्तक डाउनलोड करण्यासाठी शिर्षकावर टिचकी मारा

प्रकाश घाटपांडे
डी २०२ कपिल अभिजात डहाणुकर कॉलनी. कोथरुड पुणे
दि. २८ फेबुवारी २००८