Saturday, August 15, 2015

ज्योतिषी प्रा. रमणलाल शहा

जेष्ठ ज्योतिषी प्रा. रमणलाल शहा म्हणतात,"ज्योतिषाच्या संदर्भात अगदी काही मोजक्या व्यक्तिंचे या शास्त्राच्या प्रचीतीबद्दलचे व हे मुळात शास्त्रच आहे का? याबद्दलची शंका असते. परंतु मी अनेकवेळा विविध ठिकाणी सांगत आलो आहे ज्यांचा ज्योतिषावर विश्वास नाही त्यांना हे शास्त्र बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करु नका. अट्टाहास करु नका."
संदर्भ- ग्रहांकित ऑगस्ट २०१५
अगदी खरं आहे. पण हेच उलट बाजूने ही म्हणता येईल. बहुतांशी लोकांचे या शास्त्राबाबत शंका नसते.काहींची तर ठाम श्रद्धा असते. चुकला तर ज्योतिषी चुकू शकतो पण ज्योतिष शास्त्र नेहमीच बरोबर असते.ज्यांचा अढळ विश्वास आहे त्यांना हे शास्त्र थोतांड आहे सांगण्याचा अट्टाहास करु नका.

Friday, January 02, 2015

आत्मानंद यांचे फलज्योतिषाला आव्हान!

फलज्योतिषाला आव्हान म्हटले की लोकांना डोळ्यासमोर अंनिस दिसते. पण अमृततुषार  या आत्मानंद यांनी १९६७ साली लिहिलेल्या पुस्तकात फलज्योतिष हे शास्त्र आहे का? या प्रकरणात त्यांनी फलज्योतिषाला एक आव्हान दिले होते. ते म्हणतात," ह्या लेखातील विधानांस या शास्त्राच्या अभिमान्यांनी सविस्तर उत्तर तर द्यावेच परंतु त्या्च्या अगोदर त्या सर्वांना माझे असे आव्हान आहे की मी एक तंतोतंत अंशात्मक अशी कुंडली

Thursday, January 01, 2015

आत्मानंद यांची ज्योतिषविषयक काही मते

आत्मानंद हे अध्यात्मिक क्षेत्रात गति असणारे गृहस्थ. त्यांचे खरे नांव गणपत हिरालाल भावसार ( B.A, LLB )  जन्म:१९०० मृत्यू: १९७९ त्यांची अमृततुषार, अज्ञाताचा शोध व बोध, वैतरणेच्या ऐलतीरी ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. अमृततुषार मधे त्यांचे फलज्योतिष हे शास्त्र आहे काय? व नाडीग्रंथावरील अभिप्राय ही दोन प्रकरणे फलज्योतिष व नाडीग्रंथावर टीका व आत्मपरिक्षण करावयास लावणारी आहेत. ती मूळातूनच वाचण्यासारखी आहेत. इतर गूढ विषयावरील त्यांची काही मते विज्ञानवादी लोकांना मान्य होणार नाहीत. त्यांच्या अज्ञाताचा  शोध व बोध या पुस्तकात  भविष्यकालीन घटना व त्याचे ज्ञान. नावाचे एक प्रकरण आहे. त्यात ते म्हणतात.
"..यापैकी ज्योतिषासंबंधी सांगायचे म्हटले तर ते शास्त्र खोटे आहे असे म्हणण्यापेक्षा